ही महाराष्ट्र सरकारच्या ग्रामीण विकास आणि पंचायत राज विभागाची अधिकृत वेबसाइट आहे.मजबूत पंचायत राज प्रणालीमार्फत रचनात्मक, सर्व समावेशक व स्थायी ग्रामीण विकास साधणे हे या विभागाचे ध्येय आहे

स्वच्छ, सुंदर व हरित ग्राम तयार करण्यासाठी विविध उपक्रम राबविणे,महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाद्वारे दारिद्रय निर्मुलनाचे उपक्रम चालविणे,इंदिरा आवास योजनेअंतर्गत निवारा व निवारा विषयक सुविधा पुरविणे,प्रशिक्षणातून विकास कार्यक्रमांतर्गत लोक प्रतिनिधींचे सक्षमीकरणाद्वारे पंचायती राज व्यवस्था बळकट करणे हे या विभागाचे प्रमुख उद्दीष्ट आहेत